राजीनामा न देता जनतेच्या समस्यां न सोडवणाऱ्या आ.यड्रावकरांची राज्यपालांकडे तक्रार होण्याची शक्यता


तालुक्यातील नागरीक प्रचंड हैराण : लोकप्रतिनिधीं म्हणून यड्रावकर हलायलाही तयार नाहीत : जयसिंगपूरातून अनेक नागरीकांचे स्थलांतर..?


प्रेस मीडिया लाईव्ह :

 जयसिंगपूर ( दै. अप्रतिम) :      

जयसिंगपूरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था, शहरातील नागरीकांना रस्त्यावरून प्रवास करणे सोडा चालणेही कठीण झालेले आहे. शहरातील भु़यारी गटार योजनेचा शहरवासियांना कोणताही फायदा नाही, ती केवळ टक्केवारी वसुलीसाठी आणलेली योजना असल्याच्या टिका सुरू आहेत तर शहरातील रस्त्यांवर खड्डे, पाणी चिखल यामुळे नागरीक प्रचंड हैराण आहेत. शहरातील रस्ते करा म्हणून लोक चिखलात ऊतरून आंदोलन करत आहेत तर अनेक नागरीकांनी जयसिंगपूर सोडून बाहेर रहायला जाण्यास सुरवात केली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यड्रावकरांनी एकतर जनतेला होत असलेल्या समस्या सोडवाव्यात किंवा राजीनामा देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला जनतेचा लोकप्रतिनिधी होण्याची संधी द्यावी व समस्या सुटून जनतेला चांगले जीवन जगण्याचा अधिकार बहाल करवा अशी मागणी होत असताना, यड्रावकर हे पैसे वाटून निवडून आलेले असल्यामुळे राजीनामा देण्याचेही त्यांचे धाडल नाही त्यामुळे एकीकडे जनतेच्या समस्या सोडवायच्या नाहीत तर दुसरीकडी राजीनामाही द्यायचा नाही. त्यामुळे जनतेच्या समस्यांची ही मजा लुटणार लोकप्रतिनिधी कसा असतो याचा नमूनाच दिसत असल्याचे चित्र असल्यामुळे जयसिंगपूर शहरासह संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली असल्याचे चित्र आहे. 

        पैसे वाटून ज्यावेळी एखादा व्यक्ती निवडून येतो त्यावेळी त्याला जनतेच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नसते याचा अनुभव पावलापावलावर येताना दिसत असून यड्रावकरांना राजीनामा द्यायचा नसेल तर किमान त्यांची तक्रार राज्यपालांकडेतरी करावी का? असाही सवाल तालुक्यातून विचारला जात आहे. 

          कुरुंदवाडात गेल्या एक महिन्यापैक जास्त काळ उपोषण होत असून शहरातील पाणी योजना सुरू करण्याची मागणी करण्यात येत असताना व नागरीक अनेक दिवसापासून साखळी उपोषण करत असताना यड्रावकर ते उपोषण सोडवू शकले नाहीत किंवा कुरूदवाडातील नागरीकांसाठी पाण्याची योजनाही सुरू करून देऊ शकले नाहीत. त्यामुळे कुरुंदवाडातूनही यड्रावकरांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती मात्र तालुक्यातील जनतेच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नसलेल्या यड्रावकरांना आपण लोकप्रतिनिधी आहेत हे लक्षात तरी आहे का? असा सवालही यानंतर उपस्थित होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post