ब्रेकिंग न्यूज : तारदाळ मध्ये पाणी पूरवठा बंद....



 तारदाळ प्रतिनिधि श्रीकांत कांबळे 

 तारदाळ ता. हातकणंगले येथे भारत निर्माण नळ पाणी पूरवठा संयुक्त तारदाळ खाेतवाडी या योजनेच्या माध्यामातुन तारदाळ,खाेतवाडीसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाताे परंतु दानाेळी येथील वारणा नदीला महापुर आल्याने भारत निर्माण नळ पाणी पूरवठा योजनेचा पाणी पूरवठा गेली पाच,सहा दिवस ठप्प झाला आहे त्यामुळे महिला वर्गाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन लाखाे रुपये खर्च करुन नागरिकाना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी जलशुध्दीकरण सयंत्रे दिली आहेत परंतु गेली काही दिवस झाले त्यामधील काही सयंत्रे बंद आवस्थेत आहेत त्यामुळे महिला वर्गातुन संताप व्यक्त केला जात आहे तेव्हा लवकरात लवकर जलशुध्दीकरण संयत्राची दुरुस्ती करुन पाणी पूरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी तारदाळ ,खोतवाडी नागरिकातुन व महिला वर्गातुन हाेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post