तिवरे धरण फुटून झालेल्या 23 लोकांच्या मृत्यूप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई न्यायालयात सुनावणी

 तिवरे गाव व धरण ग्रस्त भागाला एम. डी. चौधरी यांची भेट.  



 प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

रत्नागिरी.. दिनांक 27/5/ 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे या गावातील तिवरे धरण फुटून 23 लोकांच्या मृत्यू प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई न्यायालयात ह्युमन राइट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष  एम.डी .चौधरी यांनी याचिका दाखल केले होती. त्या अनुषंगाने राज्य मानवी हक्क आयोग मुंबई न्यायालयने गंभीर दखल  घेतली आहे .

 तिवरे धरण अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले असून ते 2005 रोजी बांधण्यात आले निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे लवकर फुटून अनेक लोकांचे शेती घरे जनावरे यांचे अतोनात नुकसान झाले त्याचप्रमाणे 23 लोकांचा मृत्यू त्याच्यामुळे झाला निकृष्ट बांधकामामुळे त्याला जबाबदार असणारे जलसंपदा मंत्रालय जिल्हाधिकारी बांधकाम ठेकेदार यांची या प्रकरणात सखोल चौकशी करून मृत्यू व नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी त्याचे नुकसान व भरपाई त्वरित शासनाने द्यावी अशी मागणी ह्यूमन राइट्स असोसिएशन फोर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष  एम.डी चौधरी यांनी याचिकात केली आहे . त्याचप्रमाणे शासनातर्फे घोषित केल्याप्रमाणे पूर्ण लोकांचे स्थलांतर व पुनर्वसन झालेले नाही मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देऊ व घरे देऊ असे आश्वासित केले होते .परंतु आश्वासना प्रमाणे शासनाने ते पूर्ण केलेली नाही.

 त्या अनुषंगाने दिनांक 27 रोजी ह्यूमन राईटचे एम डी चौधरी यांनी तिवरे गावाला व बाधित कुटुंबियांना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन कोर्टात लागणारे प्रतिज्ञापत्र साक्षी पुरावे व सध्याचे परिस्थिती जाणून घेण्यासाठी व न्यायालय कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तिवरे गावाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

 याप्रसंगी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे मुंबई जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र सिंग पाटणकर पाटण तालुका अध्यक्ष ऍड संदीप कांबळे .उपाध्यक्ष जनार्दन पवार. सचिव श्री गणेश गायकवाड. वैद्यकीय सल्लागार डॉ. सुरज जाधव .कार्याध्यक्ष विनोद शिरसाट .सदस्य मेघनाथ शिवदास .पत्रकार नितीन खैरमोडे व  मारुती चव्हाण व इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post