किरकोळ झालेल्या वादातुन अडीच वर्षे वयाच्या मुलीचा खून

 

 प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील गणेश भाऊसाहेब गटे आणि त्यांची पत्नी पुजा गटे हे आपल्या दोन लहान मुला सोबत बालिंगा येथे विट भट्टीवर कामासाठी आले आहेत.सध्या विट भट्टीचे काम संपत आले असल्यामुळे ते काल 18/5/23 रोजी दुपारी बारा वाजता भवानी मंडप येथे आले होते .त्यांची मुलगी कार्तिकी (वय 2वर्षे 6महीने) ही खेळत असताना अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच तिच्या आई वडीलांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी लागलीच तेथील सीसीटीव्ही फ़ुटेज पाहीले असता त्यांच्या ओळखीचा राजु बिहारी हा इसम कार्तिकीला घेऊन जाताना दिसला गणेश गटे यांच्या तक्रारी वरुन राजु बिहारी याच्या विरुध्द तक्रार दाखल करून त्याच्या शोधा साठी पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठविले .पोलिसांनी एसटी बस स्थानक,रेल्वे स्टेशन,मोकळया जागा,रंकाळा तलाव तसेच शहरातील बगीचे आदी ठिकाणी शोध घेतला असता राजु विश्वनाथ मंडल उर्फ राजु बिहारी हा फिरस्ता असल्यामुळे हा पश्चीम बंगाल राज्यातील त्याच्या मुळ गावी मिळून आला त्याच्या कडे चौकशी केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली तो फिरस्ता असल्यामुळे नेमका ठाव ठिकाणा माहित नसल्याचे सांगू लागला .त्याच्याकडे कसोशी नेहमीच चौकशी करताना आपण गणेश गटे आणि पुजा गटे यांच्याशी दोन दिवसापूर्वी झालेलया वादातुन कार्तिकी हीला भवानी मंडप येथुन नेऊन तिचा खून करून डी मार्ट येथे असलेल्या मिरा भक्तीनगर अपार्टमेंटच्या पाठी मागे असलेल्या पाण्याच्या टाकीत टाकून तिला ठार मारल्याची कबुली दिली आहे.आरोपी याला 19/5/23 रोजी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता ता.23/5/23 पर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलिस अधीक्षक श्री.बलकवडे ,अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई,उपविभागीय पो.अधिकारी मंगेश चव्हाण पोलिस निरीक्षक सतीश गुरव आणि त्यांच्या सहकार्यानी केला.

Post a Comment

Previous Post Next Post