मुंबई दि. 21 - तोक्ते चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई ताबडतोब द्यावी , शेतीचे, आंबे ,फणस यांचे झालेले नुकसान तातडीने भरून द्यावे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी राज्य शासनाकडे केली आहे. केंद्र सरकारची ही मदत कोकणवासीयांना मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग कुडाळ तालुक्यातील झाराप गावतील सुभद्रा कुडाळकर यांच्या घराची पडझड झाली तिथे भेट दिली. कणकवली;पेंडुरगाव;
ओरोस ; कुडाळ तालुक्यांतील नुकसानग्रस्त गावांना आज भेटी दिल्या.