हुपरी :
महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी सातत्याने लढणारी एकमेव सेना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना होय. आज १५ वा वर्धापनदिन साजरा करीत असताना हा पक्ष व सेना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करुया असे प्रतिपादन मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांनी केले.
हुपरी येथे मंगळवार दि.९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापनदिन साजरा करणेत आला. या वेळी मनसे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर, सचिन इंगवले, नागेश कौंदाडे, पदम चौगुले, संभाजी बोधे, केदार मालवेकर आदि मनसे सैनिक उपस्थित होते.
Tags
Latest