प्रेस मीडिया लाईव्ह :
टाकवडे : 2005 पूर्वी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की या भागाला महापूराचे ग्रहण लागेल पण ते लागले याचं कारण हे आलमट्टी धरण आहे. अजून वेळ गेलेली नाही आलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढवण्यास विरोध करा. आता पण थंड बसाल तर सांगली कोल्हापूर सह शिरोळ तालुक्याचे भविष्य आंधकारमय असेल असे प्रतिपादन काल धनाजी चुडमुंगे यांनी केले.
ते काल रात्री टाकवडे येथिल शाहू चौक येथे झालेल्या बैठकीत बोलत होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रामगोंडा पाटिल होते.
आलमट्टी उंची विरोधात केंद्र सरकारकडे नागरिकांच्या हरकती दाखल करून घेण्याचे अभियान आंदोलन अंकुश कडून राबविले जात आहे त्या अनुषंगाने टाकवडे मध्ये झालेल्या बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले की आपल्या भागात लागोपाठ येणाऱ्या महापुरास आलमट्टी धरणच जबाबदार असून जर या धरनाची उंची आणखी वाढवली गेल्यास हा भाग पावसाळ्याच्या काळात दरवर्षी पाण्यात राहील आणि त्यामुळे शेतीचे घराचे दरवर्षी नुकसान होणार आहे.या भागाचे अस्तित्वचं नष्ट करू पाहणारे हे संकट ओळखा आणि आत्ताच या धरणाच्या उंचीला प्रत्येक नागरिकाने विरोध करावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
स्वागत तालुकाध्यक्ष नागेश काळे यांनी केले यावेळी मार्गदर्शन धनाजी चिडमुंगे राकेश जगदाळे सरकार जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी केले तसेच या बैठकीस पिरगोडा पाटील बजरंग कुंभार ,अनिल हुपरीकर ,शिवाजी काळे, प्रमोद नाईक, चिदानंद पाटील सुखदेव खिल्लारी, अनिल पाटील ,अनिल कोळी, बबन डकरे, कुतुब शेख ,रामगोंडा पाटील, ताजुद्दीन मुल्ला, रियाज शेख व नागरिक उपस्थित होते.
केंद्र सरकार च्या विविध विभागाना शिरोळ तालुक्यातून आत्तापर्यंत 400 हरकती पाठवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत किमान 1000 हरकती शिरोळ तालुक्यातून जातील असा आमचा प्रयत्न आहे त्याला 75 % पूरग्रस्त असलेल्या टाकवडे गावाने साथ द्यावी अशी विनंतीही त्यांनी काल सायंकाळी येथील शाहू चौक येथे घेण्यात आलेल्या बैठकीत केली.