प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-शाळेतला लहान मुलांच्या वादातुन टेंबलाईवाडी परिसरात एकमेकांना खुन्नस देत 40 ते 50 जणांच्या टोळक्याने काठ्या,तलवार आणि लोंखडी बार घेऊन तेथे असलेल्या गाड्यांची तोडफोड करुन दहशत निर्माण केली.
या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना समजताच पोलिसांनी शिघ्र कृती दलाच्या मदतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या प्रकरणी संशयीतांची रात्री उशिरापर्यंत धरपकड चालू होती.
सार्वजनिक मैदानावर खेळण्याच्या कारणातुन शाळकरी मुलांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असल्याचे समजले.या प्रकरणी पोलिस ठाण्यात एकमेका विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.या कारणातुन त्या टोळक्यानी या परिसरात दहशत माजवून तेथील पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड करून गाड्यांचे मोठे नुकसान केले आहे.यात टेम्पोसह दुचाकी ,पाच कार आणि लहान हात गाड्यांचा समाचेश आहे.
याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह पोलिस घटना स्थळी दाखल झाले.आणि पहाणी करून नुकसान झालेल्या वाहनांचा पंचनामा करून त्या ठिकाणी शिघ्र कृती दलाची तुकडी तैनात करण्यात आली.हा हल्ला तेथील ताराराणी चौकातील टोळक्यांनी केल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.