आळंदी देवाची येथील नदीत घाणीचे साम्राज्य , नगरपालिकेचे दुर्लक्ष



प्रेस मीडिया लाईव्ह : 

भोसरी प्रतिनिधी : 

भोसरी : महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेले आणि संतांची भूमी म्हणून ओळख असलेली  ज्ञानेश्वर माऊलीचे पवित्र ठिकाण म्हणजे आळंदी देवाची येथे भाविक पूर्ण भारतातून दर्शना साठी व सहली चे केन्द्र म्हणून बघण्यासाठी येथे येत असतात . अशा पवित्र ठिकाणच्या नदीपात्रात  कचऱ्याचे ढीग साचलेले असून या  कडे  नगरपालिकेचे  पूर्ण पणे दुर्लक्ष आहे .  या मुळे रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे , या बाबत नगरपालिकेने तात्काळ लक्ष घालून नदीपात्र  स्वच्छ करून  घ्यावे  अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post