प्रेस मीडिया लाईव्ह :
भोसरी प्रतिनिधी :
भोसरी : महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेले आणि संतांची भूमी म्हणून ओळख असलेली ज्ञानेश्वर माऊलीचे पवित्र ठिकाण म्हणजे आळंदी देवाची येथे भाविक पूर्ण भारतातून दर्शना साठी व सहली चे केन्द्र म्हणून बघण्यासाठी येथे येत असतात . अशा पवित्र ठिकाणच्या नदीपात्रात कचऱ्याचे ढीग साचलेले असून या कडे नगरपालिकेचे पूर्ण पणे दुर्लक्ष आहे . या मुळे रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे , या बाबत नगरपालिकेने तात्काळ लक्ष घालून नदीपात्र स्वच्छ करून घ्यावे अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
Tags
भोसरी