वाहतूक विभागाच्या अचूक नियोजनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून वेळेत एसटी सुटल्याने अनेक प्रवाशांनी लाल परीला पसंती दिली



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट सुटलेली पाहायला मिळाली. एस टी महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या अचूक नियोजनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून वेळेत एसटी सुटल्याने अनेक प्रवाशांनी आपल्या लाल परीला पसंती दिली. एसटीमधून प्रवास करून महामंडळाला दहा कोटी रुपयांचा महसूल केला  आहे. दिवाळी सुटीनिमित्त अनेक जण आपापल्या घरी किंवा आजोळी जात असतात. प्रवाशांची संख्या वाढणा हे गृहीत धरून एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने १५ दिवस अगोदरच अचूक नियोजन केले. जवळपास ६०० हून अधिक गाड्यांनी गेल्या दहा दिवसांत पाच लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवासी सेवा दिली आहे.

दरवर्षी दिवाळी  सुट्या लागल्या की अनेक जण आपापल्या गावी जातात. त्यामुळे दिवाळी सणापूर्वी व दिवाळी सण संपताना प्रवाशांची गर्दी होते. मात्र एस टी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा फायदा खासगी वाहतूकदार घेत असतात. ऐन सणासुदीच्या काळात प्रवश्यांना वेटीस धरत खासगी वाहतूकदार भाडेवाढ करतात. पण, यंदा खासगी वाहतूकदारांनी नियमापेक्षा अधिक भाडे आकारल्यास कारवाईचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला होता. यामुळे काही प्रमाणात का होईना याच्यावर पोलिसांचा अंकुश होताच. तर यंदा एसटी महामंडळाने ही दिवाळीची तयारी १५ दिवस अगोदर सुरू केली. यंत्रशाळेतून गाड्या दुरुस्त करून घेतल्या. त्याचबरोबर प्रत्येक गाडी वेळेत जिल्ह्याच्या सर्व मार्गांवर सुटतील, असे वेळेचे नियोजन केले. त्यानुसार सर्व आगारांनी अंमलबजावणी केली आणि त्याचे फळ म्हणून एसटीच्या सर्वच गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद लाभला.

Post a Comment

Previous Post Next Post