केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही दिलासादायक आकडेवारी जाहीर केली. ऑक्सिजन तसेच लसींचा तुटवडा असतानाही राज्यांनी कडक निर्बंधांच्या मदतीने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशाचा पॉझिटीव्हीटी रेट 14.10 टक्के इतका आहे. आठ राज्यांमध्ये एक लाखाहून अधिक, 10 राज्यांत 50 हजार ते एक लाखापर्यंत आणि 18 राज्यांमध्ये 50 हजारांपेक्षा कमी ऑक्टिव्ह रुग्ण आहेत.
- देशात आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या 1.8 टक्के लोकांना कोरोना झाला आहे.
- गेल्या तीन आठवडय़ांपासून 199 जिह्यांत रुग्णसंख्येत सतत घट होत आहे.
- रोज केवळ आठ राज्यांत 10 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे, तर 26 राज्यांमध्ये नव्या रुग्णांच्या तुलनेत अधिक लोक कोरोनामुक्त होत आहेत.