केवळ घोषणा नकोत तर प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसायला हवी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.



 राज्यात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावली आहे. मात्र बेसावध न राहता कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन काटेकोर नियोजन करा. जिह्या जिह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारा, आवश्यक औषधांचा साठा राहील याची काळजी घ्या. केवळ घोषणा नकोत तर प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसायला हवी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दृरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही.तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो. तिसऱया लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्वाचा आहे पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा करणे अतिशय गरजेचे आहे. आपण आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे, मात्र पुरवठय़ानुसार त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिह्या जिह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे.

ऑक्सिजन प्लांट उभारणीत दिरंगाई नको

आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत. नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे. याबाबत कोणतेही कारण चालणार नाही. तिसऱया लाटेची पूर्वतयारी म्ह्णून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे. येणाऱया पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिह्यातील अगदी कानाकोपऱयात होईल याचेही चांगले नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, टास्क पर्ह्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, राहुल पंडित, डॉ तात्याराव लहाने यांनी देखील आपले विचार मांडले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच विशेषतः रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा, बांधकाम आणि विद्युत उपकरणांचे ऑडिट तात्काळ पूर्ण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आणि प्रधान सचिव विजय सौरव यांनी देखील बैठकीत सद्यस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जर्हाड यांची देखील या बैठकीस उपस्थिती होती.

कडक लॉकडाऊन लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहतील

कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉक डाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहायला हवेत. अर्थचक्राला झळ बसता कामा नये. मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररीत्या केली आहे का ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आतापासून करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

परराज्यांतून मजूर कोरोना आणत नाहीत ना यावर लक्ष ठेवा 

गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, पंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत नियोजन करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post