भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले



 मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. याच पार्श्वभूमीवर खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करून आरोग्याशी खेळ करत असेल तर याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहिम अधिक तीव्र करून भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.मुंबई, पुणे आणि कोकण विभागात काही प्रमाणात कारवाई होताना दिसत असल्याची नोंद बैठकीत करण्यात आली. त्याचप्रमाणेच उर्वरित राज्यात ही कडक कारवाई करून या कारवायांबाबतचा अहवाल २० फ़ेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. खाद्य तेलातील भेसळ रोखण्यासाठी उपाययोजना, भेसळ ओळखण्यासाठी जनजागृती, भेसळ करणारी दुकाने, कंपन्या, आस्थापना, दुकानदारांवर थेट धाडी टाकून कडक कारवाई करावी. तसेच खाद्य तेलात वारंवार भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे अन्न परवाने तत्काळ रद्द करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

दरम्यान, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण या विभागांचा आढावा घेत अधिकारी वर्गाला महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. खाद्य तेलाबरोबरच प्रतिबंधित अन्न पदार्थ, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ यामधील भेसळीविषयी विभागाने सर्तक राहून भेसळखोरांविरोधात कडक कारवाई करावी आणि भेसळ खोरांवर प्रशासनाचा वचक बसवावा असे आदेशही दिले. याच माध्यमातून राज्यातील जनतेच्या आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post