ग्रामपंचायत निवडणूक : सरपंचपदाचे आरक्षण कधी काढणार? ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.



कोल्हापूर –
 राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत पूर्ण होणार असल्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला होता. आज निवडणूक निकालानंतर 1 महिन्याच्या आत सरपंचपदाचे आरक्षण काढणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वात जास्त ग्रामपंचायत जिंकल्या आहेत. यावरूनच महाविकास आघाडीचा कारभार नागरिकांना आवडला आहे. हे स्पष्ट दिसत आहे. यंदा प्रथमच निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

यापूर्वी बोगस दाखले काढून निवडणूक लढवली जात होती. त्याला या प्रकारामुळे लगाम बसला आहे. निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केल्याची घोषणा केल्यामुळे यंदा मतदानाची आकडेवारी सुद्धा वाढली आहे. त्यामुळे 80 टक्क्‌यांपेक्षा जास्त मतदान झाले.

हसन मुश्रीफ यांची चंद्रकांत पाटलांवर टीका
राजकारणात नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गल्ली, गाव, तालुका आणि जिल्हा सांभाळून पुढे गेले पाहिजे. अन्यथा पराभवा सारखी अवस्था होते, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला.

राज्यातील ग्रामपंचायत निकालाने महाआघाडी कुठेपर्यंत पोहचली आहे हे दाखवून दिले आहे कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेला सर्वाधिक सिट मिळालेल्या आहेत असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या खानापुरात शिवसेनेने बाजी मारली आहे. भाजपच्या अनेक दिगग्ज नेत्यांच्या गावात पराभवाचा सामना करावा लागला आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post