जात वैधता प्रमाणपत्र साठी तात्पुरता

तात्पुरता पुरावा सादर करण्याची मुभा


PRESS MEDIA LIVE : पुणे : प्रतिनिधी :

पुणे - राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयुक्‍तांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे, अशी माहिती आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

याविषयी मदान यांनी सांगितले की, 'राज्य निवडणूक आयोगाने 11 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 30 डिसेंबर 2020 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.राखीव जागांवर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्‍यक राहील. उमेदवार विजयी झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागणार आहे, असे मदान यांनी सांगितले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post