शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंद

शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी सह अठरा पक्षांचा पाठिंबा.


शिवसेना पंजाब, हरयाणातील शेतकऱयांच्या मागण्यांना समर्थन देत असून शेतकऱयांच्या देशव्यापी बंदलाही पाठिंबा देत आहे, अशी घोषणा शिवसेनेचे नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी  केली.

अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱयांच्या मागण्या आणि आंदोलन याविषयी प्रदीर्घ चर्चा केली. विविध पक्षांनी शेतकऱयांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात सहभागी विविध पक्षांचे नेते उद्धव ठाकरे यांच्या सतत संपर्कात आहेत, त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. या आंदोलनाबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय, याविषयी या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊत पुढे म्हणाले, गेल्या 11 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचा शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे. दिल्लीच्या वेशीवर कडाक्याच्या थंडीत सरकारी दडपशाहीची पर्वा न करता तो संघर्ष करीत आहे. पंजाब-हरयाणाच्या शेतकऱयाने देशाच्या अन्नधान्य उत्पादनात नेहमीच मोलाचे योगदान दिले. आज तोच शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरला आहे. जीवनमरणाचा लढा म्हणूनच तो सरकारशी दोन हात करीत आहे.

केंद्राने 11 दिवसांनंतरही या आंदोलनावर तोडगा काढला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱयांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांवर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरयाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरयाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे. शेतकऱयांनी केंद्राच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या बंद मागची भावना नाकारता येणार नाही. कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीसह 18 पक्षांचा पाठिंबा

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेससह 18 पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात काँगेस, तृणमूल काँगेस, राष्ट्रीय जनता दल, तेलंगणा राष्ट्र समिती, राष्ट्रीय लोकदल, आम आदमी पार्टी, भाकपा, माकपा, डीएमके, एमडीएमके, नॅशनल का@न्फरन्स, पीडीपी, पीपल्स का@न्फरन्स, अवामी नॅशनल का@न्फरन्स, जम्मू-कश्मीर पीपल मूव्हमेंट यांच्यासह अनेक पक्ष आणि संस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

आंदोलन दडपणे चुकीचे ः संयुक्त राष्ट्रसंघ

लोकांना शांततेने निदर्शने करण्याचा हक्क असून निदर्शकांना अधिकाऱयांनी दडपून टाकू नये, असे मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी हिंदुस्थानातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. गट्रेस यांचे प्रवक्ते स्टीफन डय़ुजारिक यांनी ही माहिती दिली. औत्सुक्य आहे.

Post a Comment

Previous Post Next Post