इंचलकरंजीच्या "केसरी "टोळीच्या प्रमुखासह तिघेजण हद्दपार !!!

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - इंचलकरंजी सह हातकंणगले तालुक्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या "केसरी "टोळीचा प्रमुख राहुल शिवाजी केसरी ,अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कमते आणि चंद्रकांत बाबू आळेकट्टी ( तिघे रा.आसरानगर ,इंचलकरंजी ) यांना एक वर्षासाठी कोल्हापूर       जिल्हयातुन हद्दपार केले आहे. 

येणारी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यांना रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या .त्या नुसार इंचलकरंजी पोलिसांनी "केसरी"टोळीच्या प्रमुखासह त्याचे दोघे साथीदार याचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांना  सादर केला .या प्रस्तावाची पडताळणी उपविभागीय पोलिस अधिकारी गडहिंग्लज यांनी करुन हा प्रस्ताव   पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्याकडे सादर केला.

या गुन्हेगारांना वेळो वेळी सुधारण्याच्या संधी देऊनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने "केसरी "टोळीचा प्रमुख राहुल शिवाजी केसरी याच्यावर आणि त्याच्या साथीदाराच्यावर पोलिसांत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने तसेच ही टोळी समाजात आणि नागरिकांच्यात दहशत निर्माण करुन शांतता,सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने या टोळीवर वचक बसावा या बाबीचा विचार करून पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी ता 05/04/2024 रोजी यांनी कोल्हापूर जिल्हयातुन एक वर्षासाठी हद्दपारीचा आदेश देऊन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी इंचलकरंजी पोलिसांना सूचना दिल्या.

सदर हद्दपार झालेले तिघेजण कोल्हापूर जिल्हयात आढ़ळल्यास त्यानी जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा नियंत्रणकक्ष फोन नं.0231-2662333 या नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post