प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर-गोव्यातुन पुण्याकडे जाणारयां खाजगी बसला कोल्हापुरातील पुईखडी येथे भीषण अपघात होऊन त्यात एकाच कुंटुबातील तिघां जणांचा जागीच मृत्यू झाला ते पुणे येथील असून नीलू गौतम(वय 43).रिध्दीया गौतम(वय 17)आणि सार्थक गौतम अशी त्यांची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामनच्या पथकाने जखमीना बाहेर काढ़ून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.यातील तीन-चार प्रवाशी बसच्या चाकाखाली अडकले होते.त्यांना सुखरूप पणे बाहेर काढ़ण्यात येणार असल्याचे अग्निशामन दलाचे अधिकारी मनिष रणभिसे यांनी सांगितले.या अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे.