प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : अमृत महोत्सवी 76 व्या स्वातंत्र दिनाचे ध्वजारोहण आर.एस.एस चे कोल्हापूर विभाग सह संघचालक मा.श्री.भगतरामजी छाबडा यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी संबोधित करत असताना आपल्या देशाला २०४७ साली 100 वा स्वातंत्र दिन असणार आहे त्या वर्षापर्यंत आपण जगात पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे देशातील गुलामगिरीच्या फाळनिच्या खुणा आपण पुसुन टाकल्या पाहिजेत. देशाच्या विकासाची पंचसुत्री पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. स्वातंत्र सेनानी व स्वातंत्र वीर यांना स्मरून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी मा.नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी ,अशोक स्वामी मा.उपनगराध्यक्ष तानाजी पोवार ,शहाजी भोसले ,मनोज साळुंखे ,प्रसाद खोबरे, संध्या बनसोडे अमृत मामा भोसले,रणजित अनुसे ,पांडुरंग म्हातुकडे ,सीताराम ओझा,विनोद कांकानी ,दिपक राशिनकर यांच्यासह भाजपा शहर कार्यकारणी पदाधिकारी ,महिला मोर्चा,युवा मोर्चा ,ओबीसी मोर्चा तसेच भाजपा जेष्ठ नेते व मान्यवर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .