रायगड जिल्ह्यात रसायनी हद्दीत तसेच खालापूर चौक दान फाटा राजरोसपणे गुटखा विक्री चालू

 गुटखा विक्रीवर कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

ड्रग्स अँड फूड अधिकारी काही हाकेच्या अंतरावरती राहत असून यांचे पेन मुख्य कार्यालय आहे , या परिसरामध्ये सातत्याने त्यांचा वावर असून सुद्धा गुटखा विक्रीवर कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे .  चौक परिसराला होलसेल नावाने गुटखा विक्री करणारे घारे या नावाची व्यक्ती राजरोसपणे पान टपरी वाल्यांना म** देत असून माझी वरिष्ठांच्या पर्यंत ओळख आहे दुसरीकडून कुठून घ्याल तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल तसेच रसायनी मोहोपाडा ते आपटा फाटा चावणे पातालगंगा वावेघर मोहपाडा या परिसरात------ पत् राव नावाची व्यक्ती होलसेल माल सप्लाय करत असून याचे हप्ते वर पर्यंत हप्ते पोचवत असून यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही .

दुकानदारांना डायरेक्ट माल पुरवठा करतात . येथील सर्व अधिकाऱ्यांचे हात बांधले असून कुठली कारवाई होत नसताना लोकांच्या मनामध्ये खंत व्यक्त आहे आपटा ते दांड पर्यंत सर्व पान टपऱ्या रोड लगतअसून पातळगंगा पूर्ण पान टपरी तसेच पातळगंगा ते सावरलो रोड पर्यंत पान टपरी खालापूर ते दान फाट्यापर्यंत पूर्ण पान टपऱ्या अशा प्रकारे होलसेल वाले विमल गुटका विक्री करत असतात .

राज्यात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला, स्वादिष्ट/सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट/सुगंधित सुपारी, खर्रा इत्यादींची कोणीही विक्री करीत असेल तर त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखालीही गुन्हा नोंदवून फौजदारी खटला भरला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच दिला. त्यामुळे राज्य सरकारने काढलेल्या बंदीचा आदेश मोडून कोणीही अशा पदार्थांची विक्री करत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ मार्च, २०१६ रोजी एका प्रकरणात दिलेल्या निकालामुळे 'एफडीए'च्या कठोर कारवाईवर बंधने आली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम २७२ अन्वये (विक्रीयुक्त पदार्थामध्ये भेसळ करणे), कलम २७३ (अपायकारक व विषारी पदार्थाची विक्री करणे), कलम ३२८ (विषारी पदार्थ देऊन व्यक्तीला इजा पोहोचवणे) व १८८ (सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे) या कलमांखाली 'एफडीए'कडून आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवून खटला भरला जात होता. मात्र, त्याला गुटखाविक्रेता चांद पटेलने याचिकेद्वारे औरंगाबाद खंडपीठासमोर आव्हान दिले होते. त्यात ४ मार्च, २०१६ रोजी निकाल देताना 'आयपीसी'खाली करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे खंडपीठाने म्हटले होते. तसेच 'एफडीए'ने केवळ अन्न व सुरक्षा मानके कायद्यांतर्गतच कारवाई करावी, असे आदेश दिले होते.

Post a Comment

Previous Post Next Post