सांगली जिल्ह्याचा विक्रमी 98.10 टक्के निकाल लागला.

दहावीच्या निकालात अवघ्या एका टक्क्यांनी घट . उत्तीर्णा मध्ये मुलींचे सर्वाधिक 98.68 टक्के प्रमाण आहे. दहावीच्या निकालातही पुन्हा मुलींनी बाजी मारली. 


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा विक्रमी 98.10 टक्के निकाल लागला. यंदा दहावीच्या निकालात अवघ्या एका टक्क्यांनी घट झाली. उत्तीर्णामध्ये मुलींचे सर्वाधिक 98.68 टक्के प्रमाण आहे.यंदाही बारावीनंतर दहावीच्या निकालातही पुन्हा मुलींनी बाजी मारली. कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक 98.92 टक्के निकालाची नोंद झाली. जत तालुक्यात सर्वात कमी 97.43 टक्के लागला. तब्बल 440 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. बहुतांशी विद्यार्थ्यांनी मोबाईलवरुन निकाल पाहिला.गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावी निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यंदा निकाल वेळेत जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागली नाही. शुक्रवारी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यंदा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारीत वाढ झाली.कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला .

कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 98.94 टक्के लागला. सातारा जिल्हा 98.29 तर सांगलीचा 98.10 टक्के निकाल लागल्याने विभागात तिसरे स्थान मिळाले. जिल्ह्यात 38 हजार 301 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 37 हजार 576 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 17 हजार 183 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. उत्तीर्णामध्ये 13 हजार 659 विद्यार्थ्यांना प्रथम तर 5 हजार 892 व्दितीय श्रेणी मिळाली.मागील काही वर्षांपासून बारावी आणि दहावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. यंदाही बारावीनंतर दहावीच्या निकालातही पुन्हा मुलींनी बाजी मारली. 17 हजार 350 मुलींपैकी 17 हजार 122 जणी उत्तीर्ण झाल्या, त्याचे प्रमाण 98.68 टक्के आहे. 20 हजार 951 मुलांपैकी 20 हजार 454 जण उत्तीर्ण झाले. मुलांचे पास होण्याचे टक्केवारी 97.68 टक्के आहे.

पुर्नपरीक्षार्थीचा निकाल 73.67 टक्के

जिल्ह्यातून 914 पुर्नपरीक्षार्थींची नोंदणी झाली होती, त्यापैकी 885 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 652 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी 73.67 इतकी आहे. पुर्नपरीक्षार्थीमध्ये 18 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले आहे. 93 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 114 विद्यार्थ्यांना व्दितीय श्रेणी मिळाली.

कडेगाव तालुक्याचा सर्वाधिक निकाल

जिल्ह्यात दहावीच्या निकालामध्ये कडेगाव तालुक्याने बाजी मारली. तालुक्याचा सर्वाधिक 98.92 टक्के निकाल लागला. तर सर्वात कमी जत तालुक्यात 97.43 टक्के निकालाची नोंद झाली. आटपाडी तालुका 98.66, कवठेमहांकाळ 98.46, खानापूर 97.65, मिरज 97.99, पलूस 98.73, सांगली शहर 97.83, शिराळा 98.14, तासगाव 98.30 आणि वाळवा तालुक्याचा 98.37 टक्के निकाल लागला.

440 शाळांचा शंभर टक्के निकाल

जिल्ह्यातील 440 माध्यमिक शाळांचा दहावी परीक्षेच्या निकाल 100 टक्के लागला आहे. वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 66 शाळांचा समावेश आहे. आटपाडी तालुका 32, जत 67, कडेगाव 21, कवठेमहांकाळ 30, खानापूर 36, मिरज 47, पलूस 30, शिराळा 32, तासगाव तालुक्यातील 25 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 54 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

Post a Comment

Previous Post Next Post