गरिबांच्या नावावर श्रीमंत लुबाडतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
प्रेस मीडिया लाईव्ह :
गर्भ श्रीमंत असणारे शिवाय मुलेही सरकारी नोकरीत काम करत असताना तरीही अनेक लोक रेशनदुकानांसमोर घेण्यासाठी रांगेत उभे असतात.हा प्रकार केवळ नाशिकचाच आहे असे नाही तर कमी सर्वत्र असेच चित्र दिसून येते. जिल्ह्यातही अशा प्रकारचे जवळपास ४० टक्के लाभार्थी आहेत. मात्र, त्यांची माहितीच पुरवठा विभागाला नसते , गरिबांच्या नावावर श्रीमंत लुबाडतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पात्र लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ मिळावा, गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोहोचावे यासाठी स्वस्त दरात धान्य पुरवठा योजना राज्य शासनाकडून राबविली जाते. केंद्रा कडूनही मोफत धान्य दिले जाते. ही एक महत्त्वाकांक्षी योजना सर्वांना लाभदायी अशीच आहे. चुकीची आणि खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेणारे लोक शोधून काढण्याचे काम यंत्रणेचे आहे. मात्र, अशा प्रकारची मोहीम राबविली जात नसल्याने रेशनचा सुरू असलेला पुरवठा अजूनही सुरूच आहे.
कुणाला किती रेशनचे धान्य मिळते...वाचा..
अंत्योदय : या योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंब ३५ किलो रेशन मिळते, ज्यामध्ये २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ असतो. लाभार्थींना गहू २ रुपये किलो दराने आणि तांदूळ ३ रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
दारिद्र्य रेषेखालील : दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला १० ते २० किलो रेशन दिले जाते. बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमी दराने मिळते.
प्राधान्यक्रम कार्ड : प्राधान्य घरगुती शिधापत्रिकेवर दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो रेशन उपलब्ध आहे. यामध्ये तांदूळ तीन रुपये किलो आणि गहू दोन रुपये किलो दराने दिला जातो.
पावती मिळत नाही....
रेशन दुकानदारांना कडून धान्य घेतले तर पावतीच देण्यात येत नाही , आता पावती का देत नाहीत ? याची चौकशी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे असे नागरिकांतून बोलल जात आहे.