पाणी पुरवठा सुरळीत नाही , पाणी पुरवठा खात्यातील अधिकारी फोन उचलत नाही. हे सर्व काय सुरू आहे..?

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : मनु फरास :

इचलकरंजी : शहरात गेल्या दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी पुरवठा. सुरू झाला आहे खरा पण कमी दाबा मुळे नागरिकांना पाणी मिळत नाही , पाण्यासाठी येथील महिलांना पाय पीठ करावी लागत आहे , पाण्याची टाकी उशा जवळच आहे, पण घश्याला कोरड कायम आहे. 

 या बाबत जवाहरनगर येथील साई समर्थ  गल्ली नंबर दोन मधून आमच्या प्रतिनिधीला मिळालेली  माहिती अशी की ,  पाण्याच्या टाकीवरून काही भाग मध्य रात्री पाणी रात्र भर सोडून टाकी पुर्ण रिकामी केली जाते , आणि आमचा भागात पाणी फिल्टर पंप सुरू करून सुरू केले जाईल असे सांगण्यात येते . नंतर  सांगीतले जाते तुमच्या भागात लाईट गेली आहे  त्या मुळे पाणी कमी दाबाने येते असे सांगण्यात येते . या बाबत इनपाचे प्रशासक  यांनी या संपूर्ण पाणी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी या भागातील त्रस्त नागरिक करत आहेत. पाणी पुरवठा अधिकारी फोन उचलत नाहीत , हे सर्व आपल्या पालिकेत काय सुरू आहे या कडे आपण लक्ष दिला तर बरे होईल

Post a Comment

Previous Post Next Post