पुणे मुबई महामार्गावर कारचा भीषण अपघात

 भीषण अपघातात  पाच जण जागीच ठार.. 

प्रेस मीडिया ऑनलाइन : 

सुनील पाटील :



 मुबई राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटनियर चा भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच मुत्य झाला. ही घटना रविवारी सकाळी आठ च्या सुमारास शिलाटने गावाजवळ घडल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे. अपघात एवढा भीषण होता की यात कार अक्षरशः चक्काचूर झाली आहे.

पुणे- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू (झाला आहे. लोणावळा लगत असलेल्या भागात सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या अपघातात मासी देवी तिलोक (82), सीमा राज (32), शालिमी राज (19), महावीर राज तिलोक (38) आणि चालक रिहांत अन्सारी (26) यांचा जागेवरच मृत्यू झाला. हे सगळे हरियाणा राज्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून पुण्याच्या लेनवरील भरधाव कंटेनरखाली शिरल्याने कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी आठ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, इतरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढत कार महामार्गावरून बाजूला केली. या भीषण अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post