देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करा : संभाजी ब्रिगेड

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

राणावत यानी केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे ती म्हणाली सन ‘१९४७' ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते '२०१४' मध्ये मिळालं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. ते सर्व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या तिच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

आंदोलनात अनेक मान्यवरांनी अतिशय तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करुन कंगना राणावत हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यामध्ये नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, ओबीसी संघर्ष समितीचे नेते सुरेश गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे संघटक संजय जाधव, प्रा.नरेंद्र पवार यांनी अतिशय तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करुन कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे संघटक नकूल भोईर, सतिश कदम, भैय्यासाहेब गजधने, विनोद घोडके, महेश कांबळे, मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे, विक्रम गुंड, बाळासाहेब माने, संभाजी मालपोटे बसपाने राजेंद्र पवार, संतोष बादाडे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

डांगे चौक थेरगाव येथे देशद्रोही कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा पद्म भूषण पुरस्कार काढून घ्यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या धरणे आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post