इचलकरंजी शहर वाहतूक शाखेची महत्त्व पूर्ण बैठक पार पडली.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनू फरास :
इचलकरंजी : गेल्या वर्षभरात आज* प्रथमच वाहतूक शाखेची महत्व पूर्ण घेऊन त्या मध्ये विविध प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. वाहतूक विषयी सल्लागार समिती व नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस अधीक्षक, जयश्री गायकवाड, वाहतूक शाखेचे पीआय मोरे साहेब , गाव भाग चे गजेंद्र लोहार, डी वाय एस पी महामुनी , अभिजित पठवा इत्यादी वाहतूक शाखा पदाधिकारी यांनी विविध प्रकारचे मुद्दे मांडले. सिग्नल चालू करणे, साईट पट्टे मारणे, अतिक्रमण काढण्याची विनंती , डांबरीकरण अवजड वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होते सम विषम तारीख पार्किंगचे मेन रोड बदला, दंड वसूल केलेला पैसा नगरपालिकेकडे वर्ग करून गावातील रस्ते , सिग्नल्स इतर वाहतूक संबंधी कामासाठी खर्च करता येईल अशी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. सरवात शेवटी इचलकरंजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी आपले महत्त्व पूर्ण विचार मांडून जे काही मदत लागेल ती करण्याची आश्वासन दिले.