त्या जागांवर महाराष्ट्र काँग्रेस 'मैत्रीपूर्ण लढती'साठी सज्ज

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीचा पराभव करण्याच्या प्रयत्नात विरोधी महाविकास आघाडीची एकजूट कमकुवत होताना दिसत आहे. शिवसेनेतील उद्धव गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आडमुठेपणाला कंटाळून ज्या जागांवर उद्धव आणि पवार गट तडजोड करण्यास तयार नाहीत, त्या जागांवर महाराष्ट्र काँग्रेस 'मैत्रीपूर्ण लढती'साठी सज्ज आहे. उद्धव ठाकरे यांनी आपले उमेदवार मागे न घेतल्यास आणि राष्ट्रवादीने भिवंडीच्या जागेवर उमेदवार उभे केल्यास काँग्रेसही सर्व जागांवर 'मैत्रीपूर्ण लढती'साठी आपले उमेदवार उभे करेल, असा निर्णय शुक्रवारी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले की, शिवसेनेने (यूबीटी) उमेदवारांची एकतर्फी घोषणा केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राज्यातील लोकसभेच्या सहा जागांवर 'मैत्रीपूर्ण लढती'साठी केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घ्यावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post