ओमप्रकाश बकोरीया यांची बेकायदेशीर बदली तात्काळ स्थगित करा

आम आदमी पार्टीकडून बदली संदर्भात तीव्र संताप ; स्थगिती न दिल्यास तीव्र आंदोलना चा इशारा


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे / प्रतिनिधी : 

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु नियुक्तीनंतर अवघ्या नऊ महिन्यातच त्यांची बदल करत त्यांच्या जागी सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ति करण्यात आली आहे. ही बदली बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी तरी बकोरीया यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी अन्यथा आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

यावेळी आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, आम आदमी पार्टी पुणेच्या रस्ते व सार्वजनिक वाहतुकचे सेनथील अय्यर, आम आदमी पार्टीचे कामगार आघाडीचे  संजय कोणे, सोशल मीडियाचे अक्षय धावडिकर, मिडियाचे अमित म्हस्के, कार्यकर्ते इम्रान खान, राजू परदेशी, साहिल परदेशी उपस्थित होते. 

बकोरीया हे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे पीएमपीएलने चांगला वेग घेतला होता. पुण्यात वाढणाऱ्या रहदारीचा विचार करता डबल डेकर बस आणण्याच्या प्रयत्नात बकोरिया अतिशय नियोजनबद्ध काम ते करत होते. बकोरिया जवळपास नऊ महिन्यापूर्वी या संस्थेमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी आपल्या कामाची छाप ही पुण्यामध्ये दाखवली होती. अनेक निर्णय त्यांनी अतिशय वेगाने घेत वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम केली होती त्यामुळे पीएमपीएलचे उत्पन्न देखील वाढले होते. सर्व काम सुरुळीत सुरू असताना त्यांचा कार्यकाल संपण्याआधीच त्यांची अन्यायकारक बदली करण्यात आली आहे. 

बकोरीया यांची बदली पूर्णतः बेकायदेशीर असून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी आणि राज्य माहिती आयोगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यात दिलेला आदेशाचे अवमान करणारी आणि दप्तर दिरंगाईच्या कायद्याचेही अवमान करणारी आहे.

वास्तविक पाहता कोणत्याही शासकीय करणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांची बदली ही त्याचा पूर्ण कालावधी म्हणजे तीन वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कर्ण कायद्यान कार्य कायदे करणे कायद्याने चुकीची आहे. परंतु अशा सर्रास बदल्याची प्रथा सध्या मंत्रालयामध्ये चालू आहे. बदल्या कशा आणि कधी कराव्यात या संदर्भामध्ये अनेक तरतुदी कायद्यात करण्यात आलेले आहेत. 

परंतु त्या तरतुदींचं पालन करता येत नाही करण्यात येत नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये कराव्यात. आणि बदल्यांची तयारी जानेवारी महिन्यामध्ये करावी असा नियम आहे. या नियमाकडे दुर्लक्ष करून आपल्या सरकारने जून जुलै या महिन्यांमध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे दिसून येते.

यामध्ये कोणत्याही नियमाचे पालन न करता केवळ काही लोकांना खुश करण्यासाठी या बदल्या केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. ज्यांनी या बदल्या केल्या त्यांच्या लक्षात कधी आपण सर्वोच्च न्यायालयाचा आणि कायद्याचा अवमान करत आहोत. 

परंतु या पत्राद्वारे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण केलेले कृत्य पूर्णतः बेकायदा आहे त्यामुळे या सर्व प्रकारचे आपण तू कशी करावी आणि ओमप्रकाश बकोरिया यांची बदली तातडीने रद्द करावी अन्यथा आम आदमी पक्षाबरोबरच पुण्यातल्या स्वयंसेवी संस्था व पुण्यातील जनता आंदोलन तर करेलच वेळप्रसंगी यासंदर्भात न्यायालयात देखील दाद मागेल.

तरी ओमप्रकाश बकोरियाना पुन्हा पदभार द्यावी ही विनंती तसे न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात असा इशारा यावेळी देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post