केरला स्टोरीच्या पार्श्वभूमीवर अमृत परिवार' चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

 ' कुटुंबव्यवस्था मजबूत केली पाहिजे ' : चर्चासत्रातील सूर


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या वतीने समर्थ रामदासांच्या विचारांचे प्रसारक,लेखक कै.सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 'केरला स्टोरीच्या पार्श्वभूमीवर अमृत परिवार' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक सल्लागार प्रा.शिरीष आपटे,पत्रकार आणि तरुण भारत(मुंबई)च्या उपसंपादक योगिता साळवी,विवेकानंद केंद्र  महाराष्ट्र प्रांताच्या 'अमृत परिवार'चे प्रमुख श्रीराम जोशी हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले.  ' भोवतालच्या गोष्टीबाबत जागरुक राहून, मुलांचे भावविश्व समजून घेत,कुटुंबव्यवस्था मजबूत केली पाहिजे ' असा सूर चर्चासत्रात उमटला.

  केरला स्टोरीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीमधील संयुक्त कुटुंबपद्धती अर्थात अमृत परिवाराचे महत्त्व पुन्हा सर्वांसमोर यावे,या उद्देशाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

ॲड.अंजली भाडळे यांनी चर्चासत्राचे संचालन केले.हा कार्यक्रम २५ जून रोजी सायंकाळी सहा ते आठ वेळेत  फर्गसन महाविद्यालयाच्या आवारातील  कुंदनमल फिरोदिया सभागृहात झाला.  विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे पुणे नगर संचालक जयंत कुलकर्णी, किरण किर्तने, वसुधा करंदीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिरीष आपटे म्हणाले, ' सर्व आंतरधर्मीय विवाहात फसवणूक नसते. मात्र,लव्ह जिहाद मध्ये स्वतःच्या धर्माला लपवले जाते, ओळख लपवली जाते.पैशाचे आमीष दाखवून तरूण लव्ह जिहाद कडे नेले जातात. प्रेमाचे सोंग घेणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. मोटारसायकल वरून फिरणारे कोण आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्व योजनाबद्ध रितीने होत आहे. 

योगिता साळवी म्हणाल्या, ' काही तरूणांचे  प्रेम हे पूर्वनियोजित नाटक असते. या जाळ्यात मुली फसू नयेत, याची काळजी घेतली पाहिजे.पालकांनी जबाबदारी ओळखली पाहिजे. कायदेशीर गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

श्रीराम जोशी म्हणाले, ' संकट संघटितपणे येत असेल तर आपण असंघटित राहून चालणार नाही.जागरूक राहून उत्तर शोधले पाहिजे. विवेकानंद केंद्राने अमृत परिवार संकल्पनेवर काम सुरू केले आहे. घरात स्नेह, संरक्षण, स्वातंत्र्य ,सन्मान, सेवा पूर्वी मिळत होते. ते पूर्ववत केले पाहिजे. मुलांशी संवाद ठेवला पाहिजे. भवितव्याबाबत त्यांना आश्वस्त केले पाहिजे. संस्कृती, श्रध्देशी त्यांना जोडून ठेवले पाहिजे. सर्वार्थाने समृद्ध होत राहिले पाहिजे '.


Post a Comment

Previous Post Next Post