डॉक्टर. श्री . दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी पद्म श्री पुरस्कार सन्मानित

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत .


श्री सदस्यांचा हा परिवार देश विदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्या वेली उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला .आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

 ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेश दायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यावर कोसळलेली ही आपत्ती आहे .आपल्याच कुटुंबातील घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे.

 माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्या पलीकडचे आहे मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबीयांची आणि माझी वेदनासारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारे जण या आपदग्रस्तासोबत कायम आहोत .यातील मृतांना सद्गती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना झाला प्रकार दुर्दैवीच होता.त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे नम्र विनंती डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post