पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद खैस शेख यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आमच्यावर ही कारवाई केली आहे.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 मुंबई : काल दिवसभरात राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील १० राज्यांमध्ये छापेमारी करत  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक नेत्यांना अटक केली. त्यांच्यावर टेरर फंडिंगचा आरोप लावण्यात आला. यात पुण्यातूनही  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. याच अटकेवर आता  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मोहम्मद खैस शेख यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहेत.

याविषयी बोलताना, “राज्यभरात आमच्या संघटनेच्या वीस नेत्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आमच्यावर ही कारवाई केली आहे, असा आरोप शेख यांनी यावेळी केला. पुढे बोलताना त्यांनी,” आमचा विनाकारण छळ सुरू आहे. आमच्या नेत्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत. आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी टीका शेख यांनी केली आहे. या वेळी कुल जमाती तंजीमचे समन्वयक इलियास मोमीन आणि सावित्री फातिमा विचारमंचचे अली इनामदार यांनी आपले मत मांडले.

शेख म्हणाले, की पुण्यातील दोघांसह राज्यातून एकूण वीस जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. कोणतेही चुकीचे कृत्य केले नसताना आमच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले जाते. त्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून आयुष्य उद्ध्वस्त केले जाते. आमच्या संघटनेची स्थापना २००७ मध्ये झाली. २०१४ पर्यंत आमच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

२०१४ ला भाजपची सत्ता आल्यापासून विनाकारण लक्ष्य केले जात आहे. करोनाकाळात आमच्यावर परदेशांतील देणग्यांवरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. आमची सर्व कागदपत्रे तयार होती, त्यामुळे ईडीला पुढे कारवाई करता आली नाही. आता एनआयए आमच्या संघटनेच्या कार्यालयांवर धाडी टाकत आहे. आम्ही याचा निषेध करतो. आम्हाला दहशतवाद्यांसारखी वागणूक मिळत आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. कोंढव्यात ज्या ठिकाणी एनआयएने छापा टाकला, ते पीएफआयचे कार्यालय नाही. संस्थेकडून कार्यक्रमावेळी ठरावीक वेळेसाठी हॉल भाड्याने घेतला जातो. त्या हॉल मालकालाही एनआयएने दमदाटी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी केसरबाग परिसरात कार्यालय सुरू केले आहे, असेही शेख म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post