आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा -निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके

    नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 8 (जिमाका):  जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः 8 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपल्या आसपास आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय कवीतके यांनी केले आहे.

जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूःस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post