2 बंधारे पाण्याखाली , राधानगरी धरणातून 1 हजार क्युसेक विसर्ग


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणातून 1 हजार 50 तर अल्लमट्टी धरणातून 451 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 38.88 दलघमी, वारणा 307.99 दलघमी, दूधगंगा 187.26 दलघमी, कासारी 27.19 दलघमी, कडवी 22.06 दलघमी, कुंभी 30.18 दलघमी, पाटगाव 37.56 दलघमी, चिकोत्रा 19.35 दलघमी, चित्री 17.06 दलघमी, जंगमहट्टी 13.99 दलघमी, घटप्रभा  25.96 दलघमी, जांबरे 8.48 दलघमी, आंबेआहोळ 18.51, कोदे (ल.पा) 1.98 दलघमी असा आहे.

   तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.04 फूट, रुई 43 फूट, इचलकरंजी 40, तेरवाड 37.06 फूट, शिरोळ 27 फूट, नृसिंहवाडी 20.06 फूट, राजापूर 10 फूट तर नजीकच्या सांगली 4.06 फूट व अंकली 4.05  फूट अशी आहे.


Post a Comment

Previous Post Next Post