क्राईम न्यूज : मुंबईच्या एनसीबी पथकाची मोठी कारवाई पंधराशे किलो गांजा पकडला.

 सध्या राज्यातील ड्रग्ज पॅडलर्स मध्ये धाकधूक वाढली .




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

सुनील पाटील

जळगाव राज्यात गेल्या काही दिवसापासून ड्रेस प्रकरण चांगलेच चर्चेत आणि वादात आहे त्यात एनसीबी अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे ईडी नंतर आत्ता एन सी बी ही तपास यंत्रणाही चर्चेचा विषय बनला आहे.एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रतील जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एनसीबीने दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला जात होता.

महाराष्ट्रासह मुबंईत सध्या मोठ्या प्रमाणात एनसीबीकडून कारवाया केल्या जात आहेत. यादरम्यान, एनसीबीने अनेक ड्रग्ज पॅडलर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, बॉलिवूडशी संबंधित अनेकांवरही एनसीबीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील ड्रग्ज पॅडलर्समध्ये धाकधूक वाढली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post