पुणे मनपाच्या येत्या निवडणुकीत अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो. चंद्रकांत पाटीलानी पचविण्याची तयारी ठेवावी.....राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख : 

 कोल्हापूरच्या  जनतेला घाबरून पुण्यात पळून आलेले, आपल्या पुण्यातील कोथरूड मतदार संघातील  विद्यमान महिला आमदारांचा मतदारसंघ बळकावून कसे बसे आमदार झालेले माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.त्यामुळेच ते राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांच्या बद्दल हास्यास्पद वक्तव्य करीत आहेत. त्यांनी एका अजित पवार यांनी दिलेल्या झटक्यातून सावरावे आणि  पुणे मनपाच्या  येत्या निवडणुकीत अजित पवारांच्या शंभर कार्यकर्त्यांकडून जो झटका मिळेल, तो पचविण्याची तयारी ठेवावी, हीच अपेक्षा अशी खरमरीत टीका  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप  यांनी केली आहे.

राज्यातील सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे संतुलन अधिकच बिघडले आहे. त्यामुळे, भाजपच्या इतर नेत्यांना टप्प्याटप्प्याने उपचाराची गरज असली, तरी चंद्रकांत पाटील यांना मात्र तत्काळ उपचाराची गरज आहे.सत्तेविना तडफडत असल्याने ते रोज रात्री सत्तेची स्वप्ने बघतात. सकाळी झोपेतून उठतात तेव्हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला) आपण धक्का लावू शकत नाही, याची त्यांना जाणीव होते.त्यातच त्यांना विस्मरणही होत असेल. चंद्रकांत पाटील हे ज्या माजी मुख्यमंत्री फडणवीस  यांचे गौरवी करण करू पाहात आहेत. त्यांना एकदा अजितदादांनी दिलेला झटका कसा होता हे विचारावे.कदाचित फडणवीस हे जेव्हा आपल्या शंभरहून अधिक आमदारां सोबत असतात.तेव्हा 'एकट्या अजित पवार यांनी आपल्या शंभरहून अधिक आमदारांना घरी बसवले आहे. हे शंभर आमदार खिशात घेऊन फिरू का?,' असेच म्हणत असतील. परंतु, चंद्रकांत पाटलांना ते नीट ऐकू येत नसेल.

त्यातूनच प्रदेशाध्यक्षपद जाण्याची भीती, पद टिकवण्यासाठी केविलवाणी धडपड, सत्तेची स्वप्ने,नियमित स्वप्नभंग, त्यातून वायफळ बडबड करणे, या व्याधीही त्यांना जडल्या आहेत.
त्यातच स्वत: प्रतिनिधित्व करीत असलेला विधान परिषदेचा मतदारसंघही राखता आला नाही.नुकतेच त्यांनी 'मला माजी मंत्री म्हणू नका, तीन दिवसांत कळेल,' असे वक्तव्य केले होते.
या वक्तव्याला तीन दिवस उलटून गेल्यानंतर आता याबाबत कुणी विचारले.तर काय उत्तर द्यायचे असा प्रश्न पडल्याने ते आदरणीय अजित पवारांबद्दल वक्तव्य करीत सुटले आहेत.त्या मुळे, परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधी त्यांनी त्वरित उपचार सुरू करावेत.या संपूर्ण उपचाराचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करण्यास तयार आहे.

ज्यांची स्वत:च्या जिल्ह्यातून निवडून यायची पात्रता नाही, त्यांनी आदरणीय अजितदादांवर बोलावे? विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात सपाटून मार खाणार हे स्पष्ट दिसत असल्याने चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवली.त्यासाठी त्यांच्या पक्षातीलच एका विद्यमान आमदार भगिनीचा मतदारसंघ बळकावला.आता कोथरूड मधून आमदार झाल्यावरही त्यांची 'खिशात' घालायची सवय काही गेलेली दिसत नाही. म्हणूनच, कोथरूडमधील ७४ ॲमेनिटी स्पेस खिशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post