आम्हाला वरून आलेले धान्य तेवढेच आम्ही देऊ
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
महाराष्ट्र शासन मे 30 डिसेंबर 2022 रोजी जीआर काढला होता , राशनच्या दुकानावर प्रत्येक व्यक्तीस तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देण्यात येतील आणि तेही मोफत , पण सध्या बोरले गावातील राशन दुकानावर अशी परिस्थिती आहे की तांदूळ तीन किलो दिले जात आहेत , आणि गहू मात्र प्रत्येक व्यक्तीस एक किलो दिले जात आहेत ,
या बाबत त्यांना विचारणा केली असता , ते सरळ उडवा उडवीची उत्तर देऊन , ते सांगतात की आम्हाला वरूनच कमी देण्यास सांगितलं आहे , हे असे आजपर्यंत तीन महिने झाले आहेत , जीआर मध्ये येही सांगण्यात आले आहे की , दिलेल्या राशींची पावती देण्यात यावी , पण ते पावतीही देत नाहीत , आणि राशन कार्ड वर एन्ट्री ही करत नाहीत ,
जीआर मध्ये सांगितले आहे ,तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू , देण्यात येतील , त्याच प्रमाणे काही रेशन कार्ड वर एन्ट्री केली जात आहे , पण वास्तव्यात तांदूळ दोन किलो आणि गहू एकच किलो दिले जात आहेत , ही आपल्या बोरले गावातील राशन दुकान वरची परिस्थिती आहे