6 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग


प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 177.17 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई व इचलकरंजी, वारणा नदीवरील- चिंचोली असे एकूण 6 बंधारे पाण्याखाली आहेत. 

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 177.17 दलघमी, तुळशी 74.95 दलघमी, वारणा 753.93 दलघमी, दूधगंगा 475.50 दलघमी, कासारी 55.37 दलघमी, कडवी 60.02 दलघमी, कुंभी 53.53 दलघमी, पाटगाव 76.66 दलघमी, चिकोत्रा 33.95 दलघमी, चित्री 46.93 दलघमी, जंगमहट्टी 34.43 दलघमी, घटप्रभा 40.83 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जांबरे मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

   तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 17.3 फूट, सुर्वे 18.4 फूट, रुई 45.6 फूट, इचलकरंजी 43 फूट, तेरवाड 39.2 फूट, शिरोळ 30 फूट, नृसिंहवाडी 28.9 फूट, राजापूर 15.11 फूट तर नजीकच्या सांगली  8 फूट व अंकली 10.8 फूट अशी आहे.


Post a Comment

Previous Post Next Post