राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

अटकेत असले तरी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही..राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार


प्रेस मीडिया लाईव्ह :

अहमदनगर : लाँड्रिंग प्रकरणी  काही दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिलेले आहेत.अटकेत जरी असले तरी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा ठाम निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मात्र, त्यांच्याकडील खाती आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत.नवाब मलिक यांच्या कढील गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नगरचे पालकमंत्रीपद तनपुरे यांना देण्यात येणार असल्याची चर्चा होती.ते अद्याप मिळाले नाही. मात्र, दूरच्या गोंदिया जिल्ह्याची का होईना पालकमंत्रीपदाची जबाबदारी तनपुरे यांना मिळाली आहे. नवाब मलिक यांच्या कडील परभणीचे पालकमंत्री पद धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्याकडील खातीही मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

या बैठकीत पवार यांनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात सक्रीय होण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या मुळे नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही आता नगरकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post