इंद्रायणीत पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना ज्येष्ठ वारकऱ्याला एनडीआरएफ पथकाने वाचवले .

प्राथमिक उपचारानंतर आळंदी पोलिसांनी त्यांना कुटूंबियांच्या स्वाधीन केले.

प्रेस मीडिया वृत्तसेवा : अन्वरअली शेख :

आळंदी - इंद्रायणी तीर्थात स्नान करत असताना पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना ज्येष्ठ वारकऱ्याला एनडीआरएफ पथकाने  वाचवले आहे. रघुनाथ कराडे (वय65 रा.इंजेगाव, जि. बीड) यांना रेस्क्यू करण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ वारकरी कराडे इंद्रायणी घाटावर स्नान करण्यासाठी आले होते. यावेळी ते पाय घसरून पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहत जात होते. ही बाब एनडीआरएफ पथकाच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कराडे यांना पाण्यातून बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर आळंदी पोलिसांनी त्यांना कुटूंबियांच्या स्वाधीन केले.

दरम्यान, तीर्थक्षेत्र आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक आले आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी, सुरक्षेसाठी आळंदी नगरपरिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, मंदिर देवस्थानने जय्यत तयारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी दक्षता घेत आहेत. तत्परता दाखवून ज्येष्ठ वारकऱ्याचा जीव वाचवल्याने NDRF पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post