ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे, अशा गावांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज .. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील .




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. तरीही नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे, अशा गावांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांनी मंगळवारी मिरज तालुक्यातील सावळवाडी, माळवाडी या भागातील पूरपरिस्थिती पाहणी केली. यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबरच पूरग्रस्त भागांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसह इतरही समस्या निवारणासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post