दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला'.... नाना पटोले



मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण सध्या चांगलंच रंगलेलं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलन सुर होण्याची चिन्ह दिसत आहेत. अशावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाबाबतचा चेंडू आता केंद्र सरकारच्या पारड्यात आहे. पण त्यांची एकंदर भूमिका म्हणजे 'दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला', अशी असल्याची टीका नाना पटोले यांनी केलीय. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शासकीय या बैठकीला पटोले आणि चव्हाण यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, डॉ. संजय लाखे पाटील आदी उपस्थित होते.

'मराठा समाजाला न्याय मिळावा, ही आमची भूमिका'

बैठकीनंतर बोलताना पटोले म्हणाले की, मागील भाजप सरकारने चुकीच्या पद्धतीने कायदा करून मराठा समाजाची दिशाभूल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचा एसईबीसी कायदा टिकवण्यासाठी संसदेमध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल. परंतु, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष मराठा समाजात संभ्रम निर्माण करत आहे. हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. ही वस्तुस्थिती मराठा समाजालाही लक्षात आली आहे. मराठा आरक्षण हा राजकीय वाद किंवा मतांच्या राजकारणाचा विषय नाही. या समाजाला न्याय मिळावा, ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आमची लढाई कायम राहील. झालेल्या एका बैठकीनंतर नाना पटोले बोलत होते.

Post a Comment

Previous Post Next Post