मा. सचिनकुमार यशवंत देसाई ( सरपंच) हिरलगे, यांना विजयालक्ष्मी सोशल फाउंडेशन तर्फे आदर्श समाजभुषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानपुर्वक गौरविण्यात आले.







हिरलगे : मा. सचिनकुमार यशवंत देसाई  ( सरपंच) हिरलगे, यांना विजयालक्ष्मी सोशल फाउंडेशन तर्फे आदर्श समाजभुषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानपुर्वक  गौरविण्यात आले. 

     यांनी सन: २०१० ते २०१५ या कालावधी करिता सरपंच म्हणुन कार्य केले. तर आता सध्या विद्दमान सरपंच ग्रामपंचायत हिरलगे ता: गडहिंग्लज जि : कोल्हापूर येथे कार्यरित आहेत. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. सरपंच म्हनुन कार्य करत असताना नेहमीच जनता व प्रशासन यातील दुवा म्हनुन कार्य केले. व लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली. तसेच जिल्हाव तालुक्यातील अनाथालयांना आर्थिक मदत करुन अनाथांना आधार देन्याचा प्रयत्न केला. कोरोना काळामध्ये लोकांना अन्यधान्य तसेच सर्व व्यवस्था यांनी स्वत:हा केली. तसेच शासकीय सर्व योजना गरीब, गरजु लोकांपर्यंत पोहचवत असतात. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फेटा, शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post