केंद्र शासना प्रमाणं राज्य शासनाने ही घरकुल योजना राबावावी अशी मागणी करणार. आमदार प्रकाश आण्णा आवाडे





इचलकरंजी : कोरोना महामारीमुळं जनतेचं जगणं अवघड झालं होतं. या जनतेला राज्याच्या अर्थसंकल्पात दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेसाठी काहीच नाही. त्यामुळं घरगुती वीज दरात सवलत द्यावी, कृषी संजिवनी योजनेप्रमाणं औद्योगिक संजिवनी योजना राबवावी,  केंद्र शासना प्रमाणं राज्य शासनानंही घरकुल योजना राबावावी अशी मागणी करणार असल्याचं आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्र शासनाची घरकुल योजना आहे. मात्र त्यात अनेक अटी असल्यानं गरजुंना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळं राज्य शासनानंही घरकुल योजना सुरू करावी. महिला बचत गटांना कर्जात 7 टक्के सवलत द्यावी, औद्योगिक वसाहतीत विकास कामांसाठी राज्य शासनानं निधी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब, ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, अशोक सौंदत्तीकर, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीक, अहमद मुजावर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post