थकीत पाणी पट्टी भरुन सहकार्य करा.अन्यथा कठोर कारवाई भारत निर्माण पाणी पुरवठा समितीचे आवाहन.


हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले           

भारत निर्माण पाणी पुरवठा सुरळीत चालु रहणेसाठी तारदाळ खोतवाडी मधील सर्व नळ कनेक्शन धारकांनी आपली थकीत पाणी पट्टी 15 मार्च 2021 पर्यंत भारुन सहकार्य असे आवाहन भारत निर्माण पाणी पुरवठा समितीने केले आहे. सदर पाणी पट्टी वसुली कामी 11 वसुली पथके तैनात करण्यात आली आहेत.पाणी पट्टी थकीत नळ कनेक्शन धारकांना नोटिसा देण्यात आल्या असून त्या अनुशंगाने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्यामुळे नळ कनेक्शन थकीत पाणी पट्टी भारुन सहकार्य करुन येणारी कठोर कार्यवाही टाळावी असे आवाहन भारत निर्माण पाणी पुरवठा समितीने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post